मराठी सुविचार छोटे | Lahan Marathi suvichar

मराठी सुविचार छोटे | Lahan Marathi suvichar 

नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्ट मधे पाहणार आहोत मराठी सुविचार छोटे, मराठी लहान सुविचार , तसेच शालेय सुविचार, शाळेतील छोटे सुविचार, ३००+ मराठी छोटे सुविचार यामधे आहेत , तुम्हाला ते नक्कीच आवडतील . चला  तर मग पाहूयाshort marathi suvichar 


Lahan Marathi suvichar

 रात्री शांत झोप त्यानांच येते जे 
दिवसभर प्रामाणिक असतात  

  जेवढे मोठे स्वप्न तेवढ्याच मोठ्या अडचणी  

  धन्य ती मराठी शाळा जिणे अनेक पालकांला
 इंग्रजी शाळेची फी भरायच्या लायकीचे बनविले  

  व्यावसायात तोंडात साखर आणि 
डोक्यावर बर्फ ठेऊन काम करायचे असते  

  तुम्हाला जर श्रींमत व्हायचे असेल
 तर आधी विचाराने श्रींमत व्हा  

marathi suvichar short

  खरी स्वप्ने तीच असतात जी
 तुम्हाला झोपु देत नाहीत  

  तुम्ही चांगलं केलं तरी लोक बोलतील,
 वाईट केलं तरी लोक बोलतील  

  प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात
 शुन्यातुन झालेली असते  

  जर लोक तुम्हाला वेडा समजत असतील तर 
समजुन जा तुम्ही योग्य रस्त्याने चाललाय  

  इथे केलेल्या चुका इथेच सुधारुण जायचे आहे  
चुकचाल तरच प्रगती कराल  

Lahan Marathi suvichar

  शिकण्याची भुक हीच सर्वात मोठी भूक आहे  

  स्मितहास्य ही अशी वक्ररेशा आहे 
जी अनेक गोष्टी सरळ करते  

  आयुष्यात एकच करा ज्यांनी जिंकायला
 शिकवल त्यांना हरवण्याचा पर्यत्न करू नका  

  कडु बोलणार्याचा मधही खपत नाही आणि
 गोड बोलणार्याच्या मिर्चा पण खपतात  

  शुन्यातुन निर्माण करणार्याला 
हारण्याची भिती नसते  

short marathi suvichar

  स्वताचे घर गळत आसताना पण
 पावसाची आपेक्षा करतो तो शेतकरी  

  काय करायचे हे ठरले की कसे 
करायचे याचा मार्ग सापडतो  

  गरूडा इतके उडता येत नाही म्हणुन
 चिमणी उडायचे सोडत नाही  

  स्वताच्या मेहनती वर विश्वास आसणार्या माणसाला 
आपला प्रतिस्पर्धी काय करतोय याची अजिबात पर्वा नसते  

  दुसर्याच्या चुकाकडे लक्ष देण्याएवजी स्वताच्या 
चुकाकडे लक्ष द्यायला हवे तरच लवकर पुढे जाऊ  

short marathi suvichar

  चांगली भुमिका चांगले ध्येय आणि चांगले विचार 
आसणारे माणसे कायम लक्षात आसतात  

  काजु बदाम खावुन अक्कल येते का नाही माहित
 नाही पण धोका खाऊण नक्कीच येते  

  जाहिरत नेहमी सुखाचीच करा दःखाची नको
 कारण जगात सुख खरेदी करणारेच जास्त आहेत  

  दोष लपावला की मोठा होतो आणि 
कबुल केला की नाहीसा होतो  

  आपल्यावर झालेल्या टिकेला घाबरू नाका
 कारण टिकेला जो टिकतो तोच जगात टिकतो  

short marathi suvichar

  मी रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांच्या
 नात्याला अधिक प्रबळ मानतो  

  दान दिल्यावर जे लक्षात
 राहत नाही तेच खरं दान  

  परिस्थीतीशी टक्कर देणे हे शैर्य तर 
जुळवा जुळव करणे हे चातुर्य आहे  

  भगवंत योग्य तेच देत आसतो आपण जास्त 
मागत आसतो त्यामुळे ते कमी वाटते  

 आयुष्यात सगळ्यात महाग गोष्ट म्हणजे आनंद  

short marathi suvichar

  हरतो तोच हजारो तक्रारी करतो
 आणि जिंकतो तो हजारो प्रयत्न करतो  

  विचार काय करतोस काहीतरी करून दाखव 
वेळ जाईल निघून प्रवाहामध्ये तरुण दाखव  

  सोडून देऊ नका सुरवात नेहमीच कठीण असते  

  माणसाजवळ पत हवी , ऐपत हवी आणि दुनियेला
 ठोकर मारण्याची जिगर हवी मगच दुनिया तुमच कौतुक करेल  

  सत्याचा शेवट सुख समाधानाच्या मार्गाने होतो  

short marathi suvichar

  ज्याला शिस्त नाही त्याला यश नाही  

  श्रीमंतीचा मंत्र शाळेतुन नाही तर अनुभवातून मिळतो  

  संकट हे बुडवण्यासाठी नाही तर 
पोहायला शिकवण्यासाठी येते  

  पैशाने श्रीमंत व्ह्याचे असेल तर आधी विचाराने व्हा  

  या जगात सर्वजण एकमेकाला कॉपी करतात  

मराठी सुविचार छोटे

  पळत राहा, लढत राहा आणि जिकंत राहा  

  सर्वजण मजा करण्यात व्यस्त असतील
 तुम्ही कष्ट करण्यात व्यस्त राहा  

  स्वताच्या नजरत चांगले रहा लोकांचे काय 
ते तर देवाला पण नावं ठेवतात  

  तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट 
शक्य होईल कार्याला लागण्याची 
अंत्यत उचीत अशी हीच वेळ आहे  

  तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चुक करत असाल
 तर समजा तुमची प्रगती होत आहे  

मराठी सुविचार छोटे

  सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहे तुम्ही 
काहीही आणि सारे काही करु शकता  

पैसे नसलेल्या मानसापेक्षा स्पप्न
 नसलेला माणुस जास्त गरिब असतो  

  न मिळालेल्या गोष्टीचा विचार करुन दुःखी होण्यापेक्षा
 जे आपल्याकडे आहे त्यात आनंदात 
जगणे म्हणजे खरे आयुष्य होय  

  खुश राहायचा एकच मंञ ॐ दुर्लक्षाय नमः 

  खेळ असा दाखवा की जिंकता आल नाही
 तरीआपली छाप सोडता आली पाहिजे  

मराठी सुविचार छोटे

  जिंकण्यासाठी शिकण्याची सवय लागावी लागेल  

  शिक्षणाचा अर्थ फक्त नोकरी मिळवणे असा नाही  

  आळस नावाची गोष्ट नसती तर सगळे यशस्वी झाले असते  

  आळसा माणसाचा शञु आहे तर मेहनत मित्र

 सरस्वती चा आनादर केला तर लक्ष्मी तुम्हाला उपयोगी पडणार नाही  

मराठी सुविचार छोटे

  जितक्या आंनदाने घरी जाता तितक्याच आंनदाने ऑफिस ला पण जा  

  गुरूवर भक्ती श्रद्धा निष्ठा ठेवावी त्याची परिक्षा पाहु नये  

  हिमंत नाही तर किमंत नाही विरोधक नाहीत तर प्रगतीही नाही  

  विचाराने विचाराला विचारलेला
 विचार म्हणजे सुविचार होय  

  जर तुम्ही असा माणुस शोधताय जो तुमचे 
आयुष्य बदलेल तर आरशात जाऊण पहा  

मराठी सुविचार छोटे

marathi suvichar short


  काही उड्या जमतात काही फसतात उडी जमली 
किंवा फसली तरी दोन्ही बाबतीत ते 
अनुभवाचे माप पदरात टाकतात  

  चूक पाठीसारखी असते दुसऱ्याची 
दिसते स्वतःची कधीच दिसत नाही  

  आयुष्यात संपण्यासारखे काहीच नसते एक
 नवीन सुरुवात तुमची वाट पाहत असते  

  अचूक परिस्थितीत संस्कारांची योग्य शिकवण मिळाली
 कि आयुष्याची जडण घडण योग्य प्रकारे होते  

  स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणं हे हरलेल्या 
माणसाच्या जिवंतपणाची निशाणी आहे  

मराठी सुविचार छोटे

  काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत
 लवकर पोचते कारण रुतणारे 
काटे पायाचा वेग वाढवतात  

  कोणतेही काम करताना लोक काय
 म्हणतील याचा विचार करु नका 
कारण लोक हसायला येतील पोसायला नाही  

  जबाबदारीची जाणीव असली की 
सकाळी उठायचा कंटाळा येत नाही  

  आपल्या मागे होणारी आपली चर्चा आणि 
आपली बदनामी हीच आपली खरी प्रगती आहे  

  कौतुक हा शब्द खुप छोटा आहे पण ते 
करायला मन मात्र खुप मोठं लागतं  

marathi suvichar short

  स्वाभिमानाचा लिलाव करुन माठे होण्यापेक्षा 
अभिमानाने लहाण राहणे कधीही चांगले  

  समाज हा सरळ विचार का करणार्या लोंकामुळे 
सरळ राहत नसुन वाकडा विचार 
करणार्या लोकांमुळे राहत असतो  

  आंनदी राहण्याचा साधा एकच मंञ आहेआपेक्षा
 स्वता कडुनच ठेवा समोरच्या कडून नको. 

  एखादया एरियाचे भाई होण्यापेक्षा एखाद्या 
कंपनीचे BOSS व्हा घरच्यांना बर वाटेल  

  पैसे खर्च करताना जर तुम्ही सारखा विचार करत असाल , 
तर याचा अर्थ तुम्ही कष्टाचा पैसे कमवताय  

marathi suvichar short

  उगवणा-या सुर्याचे आणि पळना-या घोड्याचे
 चिञ भिंतीवर लावुन प्रगती होत नसते 
प्रगती करण्यासाठी सुर्योदयाच्या 

स्वतावर विश्वास ठेवायला शिका तरच जग तुमच्यावर विश्वास ठेवेल  

  सगळेच धडे शाळेच्या पुस्तकातुन शिकायला 
हवेत असे काही नाही, काही घडे हे 
अनुभवातुन शिकावे लागतात  

  काम हे आज पासुनच सुरु होत असते.
 उदयापासुन सूरु होतो तो टाईमपास  

  कष्ट ही अशी शक्ती आहे की ती माणसाची
 क्षमता तपासते आणि विकासाच्या मार्गावर नेते  

marathi suvichar short

  दारावर घोड्याची नाळ लाऊन यश मिळत नाही
 यश मिळविण्यासाठी स्वताच्या 
दोन्ही पायात नाळ लावावी लागते  

  सल्ला हा नेहमी स्पस्टवक्त्याकडून 
घ्यावा गोडबोल्या कडून नाही  

  आपण जे देतो ते आपल्याकडं परत येत
 त्यामुळे चांगल धा चांगलच मिळेल  

 स्वप्न जेवढे उंच आणि मस्त आसतात ना त्यासाठी 
परिक्षाही तेवढ्याच जबरदस्त आसतात  

  जग गरजे नुसार चालत आसतं थंडीत ज्या सुर्याची 
वाट बघितली जाते त्यालाच उन्हाळ्यात शिव्या दिल्या
 जातात तुमची किंमत तेव्हाच होईल 
जेव्हा तुमची गरज असेल  

marathi suvichar short

  माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसतो जेव्हा तो नशेत 
आसतो मग ती नशा पदाची उंचाची
 पैशाची रूपाची अथवा दारूची  

  प्रोत्साहण ही अशी गोष्ट आहे ज्याने सामान्य 
माणुस देखील असामान्य काम करू शकतो  

आधी उठुन घोड्याचे वेगाने 
कष्टाची दौड करावी लागते  

  स्वता शी वाद घालाल तर उत्तरे सापडतील दुस-याशी
 वाद घालत बसाल तर असंख्य प्रश्न निर्माण होताल  

  प्रयोग करा प्रयत्न करा, यश दिसेना तर
 प्रयत्न करण्याच्या पदधतीत बदल करा  

marathi suvichar short

  जीवनातले सर्वात चांगला पुस्तक मापण स्वतः आहोत
 फक्त स्वता ला वाचणे माणि समजणे बाकी आहे  

  यशामागे कधीही रहस्य वगैरे 
नसते प्रचंड मेहनत असते  

  चमत्कार हे नेहमी मेहनत करणान्या
 माणसाच्या आयुष्यात होतात  

  जेवढी मोठी स्वप्ने असतात, तेवढ्याच मोठया अडचणी येतात 
आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात 
यश सुदधा तेवढच मोठं मिळत  
'
  परिस्थीती अजून सोपी होणार नाही
 तुम्हाला अजून सामर्थवान व्हावे लागेल  

marathi suvichar short
marathi suvichar short

  अनेक वेळा चांगले क्षण हे
 कठोर प्रसंगाच्या वेषभुषेत येतात  

  आठवड्याच्या सुट्टीसाठी नाहीतर
 स्वप्नांसाठी काम करणार्यांना शुभेच्छा  

  नेतृत्व म्हणजे नुसताच गाजावाजा करणारी शक्ती नव्हे तर 
लोकांना सशक्त करणे म्हणजे नेतृत्व  

  भितीला टाळाल तर ती वाढत जाते भीतीनचा 
सामना कराल तर ती पळुन जाते  

  तुम्हाला हे आयुष्य मिळालय कारण तम्ही हे 
आयुष्य जगण्यासाठी पुरेसे समर्थ आहात  

  जो स्वताच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला 
दुसर्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही

पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे 

असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.


पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे 

सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह !


स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.

 

अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.


चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.


स्वधर्माविषयी प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म.


अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !


क्रोध माणसाला पशू बनवतो.


आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.


आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.


जे नंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक !


कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.


परमेश्वर खऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.


भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.


माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.


बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.


marathi suvichar short
मराठी सुविचार छोटे

10 छोटे सुविचार मराठी 

शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.


तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.


आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात. आणि नुसते सुविचार असुन चालत नाही; ते आचरणात आणावे लागतात.


सुविचार मराठी छोटे photo | Small Marathi Suvichar Photo


जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.


आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.


जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !


लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.


हृदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.


कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर हक्क दुर पळतात.


 हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.


आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.


गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.


आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.


जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो.


अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते. तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.


 न मागता देतो तोच खरा दानी.


चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.


केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.


समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही


भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.


थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.


आजचा सुविचार | Today Marathi Suvichar


आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,


फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !


marathi suvichar short
Small Suvichar Marathi


एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.


अतिथी देवो भव ॥


अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.


दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.


आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.


निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.


खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.


उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.


चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.


चांगले सुविचार | Good Thought In Marathi


नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.


माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.


सत्याने मिळतं तेच टिकतं.


जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.


परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.


हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !


स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.


प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.


खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची


तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.


वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !!


जो गुरुला वंदन करतो; त्याला आभाळाची उंची लाभते.


गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.


झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.


माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी


क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.


सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.


मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.


आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.


बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.


मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते


आत्मविश्वास सुविचार मराठी / Possitive Attitude Status.


marathi suvichar short
Lahan Marathi Suvichar

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.


शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.


मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.


आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.


एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.


परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी!


खिडकी म्हणजे आकाश नसतं.


आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.


प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान


जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.


यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.


प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.


ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.


यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती - आत्मविश्वास.


प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !


चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !


मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.


छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.


आपण जे पेरतो तेच उगवतं.


फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.


उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.


शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.


प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.


आधी विचार करा; मग कृती करा.


जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे


वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.


भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फुल कशासाठी जगायचं हे शिकवते.


कविता म्हणजे भावनांचं चित्र!


संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.


तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.


ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !


स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.


अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.


तुलना करावी पण अवहेलना करू नये.


समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.


आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.


मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.


चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.


व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.


आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.


तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.


अश्रु येणं हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे.


विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.


मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.


आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.


मराठी सुविचार छोटे

आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.


प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.


तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.


सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.


काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.


लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.


चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.


तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.


भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.


चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.


आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.


उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही


पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.


Lahan Marathi suvichar /  लहान मराठी सुविचार


अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.


मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.


रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन!


अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.


अंथरूण बघून पाय पसरा.


कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.


तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.


अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.


संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.


सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.


सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.


शरीरमाध्यम खलुं सर्वसाधनम ॥


सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.


शीलाशिवाय विद्या फुकाची आहे.


जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.


एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.


कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.


आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दूर्मिळ असते.


ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.


कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.


देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !


आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.


मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !


ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.


जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.


आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.


Small Marathi Suvichar | स्मॉल मराठी स्टेटस 


रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.


जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !


लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.


कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.


 जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.


 पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.


 आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.


 गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !


 कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.


 स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !


 ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा.


जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !


 सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.


 श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.


आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.


 एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.


 प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.


 आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !


 आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !


 स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.


 अश्रुंनीच हृदये कळतात आणि जुळतात.


 हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.


 आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.


 बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?


कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !


 टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.


नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.


यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.


आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.


खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.


जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.


प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.


 स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.


 आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.


 माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.


 जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.


 तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.


 शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.


हसा, खेळा पण शिस्त पाळा.


आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.


 स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.


 तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !


 काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.


 काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.


 एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.


 हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!


उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.


या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.


 तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच !


केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.


दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.


 माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.


 प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.


 व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.


 काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.


दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.


शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका


 जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.


दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.


 शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.


जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.


परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.

मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.


 दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.


 आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार ?


जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.


पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.


आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.


अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.


मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.


नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.


अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.


सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.


शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.


गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.


दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.


पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.


ऐकावे जनाचे करावे मनाचे.


 एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.


केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.


 बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.


 चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.


तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.


दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.


स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.


सुविचार मराठी छोटे 50

 स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.


त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !


जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या


दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.


पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.


उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.


१जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.


मरावे परी कीर्तीरूपे उरावे.


आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.


 मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.


बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.


तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.


गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.


स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.


 प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.


आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.


 जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.


सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.


उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.


 लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.


मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.


 जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्ण असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.


 सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.


 जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.


 संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.


 जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.


 सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा…। हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.


 क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.


 जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.


 जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.


 जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.


 वैभव त्यागात असते, संचयात नाही.


तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.


 खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.


मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.


पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.


 ह्रदयात अपार प्रेम असले की सर्वत्र मित्र.


टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.


प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.


मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.


 भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.


वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.


त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.


 शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.


 कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.


 बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.


दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.


ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.


दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.


जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.


एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥


सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.


श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.


राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.


संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.


 असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.


 उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.


 ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.


जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.


Search Terms - मराठी सुविचार छोटे, मराठी लहान सुविचार , तसेच शालेय सुविचार, शाळेतील छोटे सुविचार, ३००+ मराठी छोटे सुविचार, 10 छोटे सुविचार मराठी, सुविचार मराठी छोटे 50,   मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार संग्रह, 200 मराठी सुविचार छोटे, चांगले सुविचार मराठी, 100 मराठी सुविचार, सुविचार मराठी छोटे 50  

2 Comments

  1. मुलं व मुलीचा सुविचार पाठवा लव्ह कर पाठवा

    ReplyDelete
Previous Post Next Post